येरमाळा पोलीस ठाण्याचा कारभार म्हणजे “जागते रहो, हमारे भरोसे मत रहो !”
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
धाराशिव:- कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटना पाहता चोरट्यांना पोलीसांचा कुठलाही धाक राहीलेला दिसत नाही उलट चोरटे येरमाळा पोलीसांना वारंवार आव्हान देत असल्याचे दिसत आहे परंतू तरीही येरमाळा पोलीसांना किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षकांना काहीही फरक पडत नसल्याचे दिसत आहे.येरमाळा पोलीस ठाण्याचा कारभार म्हणजे… “जागते रहो, हमारे भरोसे मत रहो !”नुकतेच सोलापूर येथील बार ट्रेडच्या गाडीतून येरमाळा ते तेरखेडा येथील आरुष बार च्या अंतरारात सकाळी साडेनऊ ते दहा वाजेदरम्यात भर पावसात तीस ते चाळीस दारूचे बॉक्स चालत्या गाडीतून चोरीला गेल्याचा प्रकार घडला.यासारखे प्रकार सातत्याने होत आहेत यासोबतच फिर्यादी मोहम्मद छितर हनीफ, वय 46 वर्षे, रा. अन्द्रोला ता. हतीन जि. पलवल राज्य हरियाणा हे आयशर ट्रक क्र टीएस 07 यु 0625 मध्ये हैद्राबाद येथुन माल भरुन जात असताना दि. 10 जुलै 2025 रोजी 06.00वा.सु.एनएच 52 हायवे रोडवर तेरखेडा गावाजवळ एच पी पेट्रोपंपा समोर अज्ञात व्यक्तीने ट्रकची ताडपत्री फाडून एक कपड्याचा बॉक्स,क्लॉथ लेबल असलेला एक कारटुन बॉक्स,प्रिंटेड सारीज लेबल असलेला एक कारटुन बॉक्स, डी. नं 2031 बॉक्स लेबल असलेला एक कारटुन बॉक्स,क्लॉथ लेबल असलेला एक काटुन बॉक्स, ॲपल जॉर्जटे लेबल असलेला एक कारटुन बॉक्स असा एकुण 2,72,177₹ किंमतीचा माल चोरुन नेला अशा मजकुराच्या फिर्यादी मोहम्मद हनीफ यांनी दि.24 जुलै 2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(ब), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे येरमाळा पोलीस ठाण्यात जर एखादा पिडीत माणूस फिर्याद देण्यासाठी गेला असता त्याला पोलिसच वकीलासारखे उलट प्रश्न विचारले जातात पोलीस पोलिस न राहता वकीलच आहे की काय? असा प्रश्न फिर्याद घेऊन जाणाऱ्या माणसाला पडतो वारंवार होत असलेल्या चोऱ्या पाहता व्यापारी व शेतकऱी, वाहतूकदार सर्वसामान्य जनतेने नेमकी अपेक्षा ठेवायची कोणाकडून ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.





















