दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !
संपादकीय/रोहन गलांडे पाटील
कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्ता दुरूस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कळंब उपअभियंता यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा ठिय्या अंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दहिफळ परतापुर रस्त्याचे डांबरीकरण दोन वर्षापुर्वी झालेले आहे. काही महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडले होते. रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचा संशय काम चालु असताना ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. खड्डे चुकवताना अनेक प्रवाशी गाडीवरुन पडले आहेत.जखमी झाले आहेत.याच मार्गे शेकडो विद्यार्थी शाळेला जातात. हा रस्ता कळंबकडे जातो परिसरातील नागरिक याच मार्गे जातात. वाहनाची सतत वर्दळ असते. रस्ता खराब झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच गावालगत असणाऱ्या नदीच्या पुलावर भगदाड पडले आहे. तसेच काही ठिकाणी रस्ता दबला आहे.पावसाळ्यात या पुलावर पुर येतो.पाण्याची पातळी कळत नाही. त्यात सध्या पुलावर खड्डे तर पडले आहेत. पुलाच्या एका बाजुला भले मोठे भगदाड पडले आहे.लवकरात लवकर रस्त्याची दुरूस्ती करावी.दि २२ जुन २०२६ पर्यंत रस्ता दुरूस्त करा अन्यथा ठिय्या अंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदन देताना माजी ग्राम पंचायत सदस्य प्रशांत भातलवंडे,नारायण भातलवंडे,सुरेश मते,शिवशंकर भातलवंडे उपस्थीत होते.




















