मराठा सेवकाचा बळी/अतुल घरत पाटील केवळ अपघाती मृत्यू नसून वाल्मीक कराडच्या माणसाने कारखाली चिरडून मारल्याचा संशय ? पुढील तपास पोलीस करत आहेत?
बीड/ प्रतिनिधी
मराठा सेवकाचा बळी अतुल घरत पाटील केवळ अपघाती मृत्यू नसून वाल्मीक कराडच्या माणसाने कारखाली चिरडून मारल्याचा संशय ? पुढील तपास पोलीस करत आहेत?ज्या गाडीने मराठा सेवक अतुल घरत पाटील यांना चिरडले त्या गाडीवर मागे “किंग आण्णा” असे लिहिलेय. हा किंग आण्णा कोण आहे? ही गाडी पोलिसाची असून अशी माहिती मिळतेय. अपघात झाल्यानंतर अतुल जिवंत होता असे म्हटले जाते आहे.जर त्या पोलिसाने उचलून तत्काळ हॉस्पिटलमध्ये आणले असते तर अतुल वाचला असता पण अपघात झाल्यानंतर हा पोलिस गाडीमालक तिथून पळून गेला. स्थानिक लोकांनी अतुलला बीडला हॉस्पिटलला आणत असताना बार्शी नाका येथे अतुलचा दुर्दैवी मृत्यू झाला.जर गाडी मालक पोलिसाने माणुसकी दाखवली असती तर आज अतुल आपल्यात असता. अतुल आपल्या साईडने जात असताना मागून येऊन या गाडीने धडकले. जवळपास पन्नास फुट गाडीने चिरडत नेले. ही घटना पाटोदा पासून जवळच असलेल्या दासखेड फाटा येथे घडली.या घटनेची बीड पोलिसांनी गंभीर दखल घेऊन आरोपीस तत्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. गाडीचा मालक पोलीस असून त्याने अपघातानंतर तिथून पळ का काढला ? तसेच अपघात ठिकाणी अनेक पुरावे लपविण्यासाठी त्याने रात्रीतून बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे हा अपघात नसून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. तरी बीड पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे चर्चा सत्र सुरू झाले आहे.





















