कुशलसाठी नागपुर विभागाकडे अकराशे कोटी आले /बीड जिल्ह्याला किती मिळणार ?
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे होतात. विशेष करून फळबागांची लागवड रोहियोतून होत आहे. अनेक शेतकर्यांचे कुशलचे बीड प्रलंबित असून काही दिवसापुर्वी राज्य सरकारने नागपुर विभागाकडे 1183 कोटी रूपये वर्ग केले आहेत. बीड जिल्ह्यासाठी त्यातील किती पैसे मिळणार याकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यातील शेकडो शेतकर्यांचे पैसे थकीत राहिलेले आहेत. शेतकरी दररोज कुशलच्या बिलाची वाट पाहत आहेत.रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग, रस्ते, वैयक्तीक सिंचन विहिरी, घरकुल यासह विविध कामे केली जातात. फळबागासह इतर कामांचे कुशलचे बिल प्रलंबित आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने नागपुर विभागाकडे कुलशलसाठी 1183 कोटी रूपये वर्ग केले असल्याचे सांगण्यात येते. यातील बीड जिल्ह्याला किती मिळणार याकडे लक्ष लागून आहे. कारण जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांचे पैसे प्रलंबित आहेत. हे पैसे कधी मिळतात याची शेतकरी वाट पाहत आहेत.डीसी अभावी इंजिनिअरचा पगार परत बीड पंचायत समितीचे बीडीओ बदल्ल्यानंतर कार्यालयाचा कारभार सुरूळीत झालेला नाही. गटविकास अधिकार्यांची डीसी वेळेवर बनत नसल्याने आलेले पैसे परत जातात. काही दिवसापुर्वी तालुक्यातील इंजिनिअरचा दोन महिन्यांचा पगार आला होता. मात्र डीसी अभावी तो परत गेला. आता कुशलचे पैसे तरी डीसी अभावी परत जाणार नाहीत ना? याची काळजी संबंधित विभागाने घ्यायला हवी. बीड पंचायत समितीचा कारभार सुधारण्यासाठी जि.प.च्या नवीन सीओ ने लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.





















