राज्य एकत्र करणार पन महादेव हत्तीनीला परत आणणारच – मनोज जरांगे पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्यात गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आता जन चळवळ उभी राहिली आहे.त्या मध्ये संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की काही झाले तरी जमले तर राज्य एकत्र करूत पन महादेव हत्तीनीला परत आणणारच असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दीले आहे तसेच जिल्ह्यातील 2 लाख 421 जणांच्या सह्यांची पत्रं महामहीम राष्ट्रपतींना आज पाठवण्यात आली. “गुजरातमधील वनतारा हत्ती संगोपन केंद्राचे सीईओ विहान कराणी यांनी कोल्हापूरला भेट दिली. या भेटीत महादेवी हत्लातीणीला परत करण्याचं आश्वासन दिलं असेल, तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी महादेवी हत्तीणी कधी परत येणार हे जाहीर करावं,” असं आव्हान काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय.महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला नेलं गुजरातला : सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातला नेण्यात आलं. यामुळे जिल्ह्यासह राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शुक्रवारी गुजरातच्या वनतारा हत्ती संगोपन केंद्राचे अधिकारी कोल्हापुरात आले होते. त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली होती. “न्यायालयानं आदेश दिल्यास महादेवीला पुन्हा नांदणी मठाकडं पाठवण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली होती,” अशी माहिती पालकमंत्र्यांनी या बैठकीनंतर दिली. मात्र नांदणी इथल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींच्या अध्यक्षतेखाली मठात लोकप्रतिनिधी, श्रावक श्राविका यांची बैठक झाली. या बैठकीत मठाधिपतींनी मार्गदर्शन करताना, “सर्व समाजानं महादेवीला परत आणण्यासाठी दिलेला पाठिंबा अभूतपूर्व होता. वनतारानं मठाला महादेवी परत पाठवण्याचं लेखी पत्र द्यावं,” असं आवाहन यावेळी मठाधिपतींनी केलं. तर “महादेवीला परत आणण्यासाठी आता शेवटपर्यंत लढा देऊया, यासाठी मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा हवा आहे,” असं भावनिक आवाहन त्यांनी केलं. तसेच संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की काही झाले तरी जमले तर राज्य एकत्र करूत पन महादेव हत्तीनीला परत आणणारच असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दीले आहे.





















