ज्या महाविद्यालयात चिटिंग तिथे विद्यार्थी प्रवेशांचा उत/प्रवेश शुल्क घेऊन संस्था चालक मालामाल ?
केज/प्रतिनिधी
शैक्षणिक संस्था जशा धन-दांडग्यांच्या आणि पैशावाल्यांच्या आहेत तसेच शिक्षण ही आता धन-दांडग्यांचे आणि पैश्यावाल्यांचे झाले आहे. कारण दहावी आणि बारावीचा प्रवेश प्रक्रियेत बहुतांश विद्यालये आणि महाविद्यालये मालामाल झाल्याचे पहावयास मिळत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. शिक्षण आता गोर-गरीब आणि सर्वसामान्य पालकांची मुले यांना न परवडणारे शिक्षण झाले आहे. हजारों रुपये प्रवेश फी घेऊन शिक्षण देणारे वर्षे न भरवता) विद्यालये आणि महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेत मात्र जातीने लक्ष देऊन प्रवेश प्रक्रिया पार पाडत असतात. दहा ते वीस हजार रुपये प्रत्येकी एक अॅडमिशन साठी घेतले जातात बहुतांश विद्यालय आणि महाविद्यालयामध्ये इयत्ता दहावी वगार्साठी दहा हजारापासून पुढे तर इयत्ता आकरावी आणि बारावीचा प्रवेश घेण्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपये डोनेशन घेतले जाते.शहरातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागात ओढा अनेक महाविद्यालयाचे प्रवेश हे सुरू होतास दोन ते तीन दिवसांमध्ये फुल झालेले असतात कारण ग्रामीण भागातील ढिसाळ शिक्षण पद्धती आणि परीक्षेमधील कॉप्यांचा सुळसुळाट यामुळे वाढती टक्केवारी यासाठी शहरातील विद्यार्थ्यांची हा ग्रामीण भागातील खेडेगावातील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अधिक पसंती दिसून येते.ज्या महाविद्यालयांमध्ये परीक्षेच्या वेळी कॉपी बालते अशा महाविद्यालयातील प्रवेश फुल झाले आहेत. तर ज्या महाविद्यालयामध्ये कॉपी मुक्तीचे काटेकोर पालन केले जाते अशा महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी रिक्त जागा असल्याचे काही शिक्षण फोन करून सांगण्यात येत.





















