जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातून संदेश/गावाकडे असलेले मराठे मुंबई कडे निघा !
मुंबई/प्रतिनिधी
मुंबई अझाद मैदानावर सुरू असलेल्या संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा तीसरा दीवस आहे व आज संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी काही आव्हान केले आहे गावाकडे असलेल्या मराठा बांधवांनी मुंबईकडे येत राहावे,रेनकोट वाटण्यासाठी कोणी पैसे गोळा करीत असेल तर त्यांना पैसे देऊ नका,शनिवारी-रविवारी मोठ्या संख्येने मराठे मुंबईत येणार ,मुंबईत येणाऱ्या बांधवांनी आपली वाहनेपार्किंगमध्ये लावूनच आझाद मैदानाकडे यावे ,अन्नसामग्री पोहोच करणाऱ्या बांधवांनी पार्किंगच्या ठिकाणी देखील अन्नसामग्री पोचवावी,एकाही आंदोलकाने दगडफेक व जाळपोळ करू नये. मी तुम्हाला शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळवून देतो,दोन दिवस मी पाणी पीत होतो उद्यापासून पाणी देखील सोडणार,ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडत नसतो असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.





















