ग्रामीण भागात इच्छुक उमेदवार लागले कोरड्या भेटीगाठी साठी कामाला /निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासाची चर्चा नाही !
बीड/प्रतिनिधी
केज तालुक्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुक उमेदवार कामाला लागल्याचे-चित्र पहावयास मिळत आहे. ज्या सर्कल अथवा गणातून उभे रहावयाचे त्या गावातील मतदारांशी संपर्क वाढविताना गावातील समस्या व विकासाबाबत इच्छुक चर्चा करताना दिसत नाही. पक्षाने आपली उमेदवारी फिक्स केल्याचे मतदारांना सांगून इच्छुक मतदारांच्या गाठी, भेटी करीत असताना दिसत आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होऊन तब्बल काही वर्षांचा कालावधी उलटला आहे. मागील निवडणुका झाल्यानंतर जुने मित्र व नातेवाईकांचा आधार गावाशी घनिष्ठ संबध दाखविण्यासठी जुने वर्ग मित्र, नातेगोते काढून गावातील मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी सध्या रब्बी हंगामाच्या पेरणीत गुंतला असून पिकाला पाणी देणे, शेत ओलवणे, आंतरमशागत करणे या कामात व्यस्त आहे. अनेक गावांत रोहित्र नादुरुस्तीसह विजेचे इतर प्रश्न आहेत. रस्ते, नाल्या, सफाईसह इतर प्रश्न असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचे प्रश्न कसे सोडवायचे याकडे दुर्लक्ष केले जात आहे .यावर इच्छुक काही करतांना दिसत नाही फक्त लोकांना भेटीगाठी करतांना दिसत आहे .आजपर्यंत एकही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य गावातील अडचणी जाणून घेण्यासाठी गावात दिसले नाही. चिंचोली माळी सर्कल मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार गावा-गावात फिरुन मतदारांच्या भेटी घेत आहेत. त्यासाठी गावातील युवकांना आपल्याकडे ओढण्यासाठी त्यांच्याशी संपर्क वाढविला जात आहे. आपले तिकीट फिक्स असल्याचे सांगून इच्छुक पक्षाची उमेदवारी मिळाल्याच्या आविर्भावात गावातील समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करीत नाही . जिल्हा परिषद सर्कल मध्ये तरुणांनी जुने उमेदवार कडे फिरवली पाठ असल्याने जिल्हा परिषद सदस्य . पंचायत समिती सदस्य नविन चेहरा मोहरा वळवला दिसत आहे याकडे कोणताही पक्ष नसला तरी आम्ही त्यांना मदत करु असे परिसरातील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे





















