केज ,अंबाजोगाईकर म्हणतात, पाटील नाविलाज झालाय ! टक्केवारीशिवाय कामच होत नाहीत, जरा तुमचा हाबाडा दाखवा की?
केज/प्रतिनिधी
केज अंबाजोगाई तालुक्यातील विविध शासकीय योजना, विकासकामे आणि ठेकेदारी प्रकल्पांमध्ये ‘टक्केवारी सावट दिवसेंदिवस गडद होत असून,त्याचा थेट परिणाम विकासकामांच्या गुणवत्तेवर होत असल्याचे गंभीर वित्र पुढे आले आहे. सरकारी निधीतील कोणतेही काम टक्केवारीशिवाय होत नाही अशी उघड प्रथा निर्माण झाल्याने निकृष्ट कामे, अपूर्ण प्रकल्प, आणि सार्वजनिक पैशांची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत असल्याचे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे योजनांमध्ये कामांपेक्षा टक्केवारीला अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे विकास कामे खोळंबले असून याचा केज ,अंबाजोगाई करांना रता वैताग आला आहे. तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनीही याकडे लक्ष घातले तर फार मोठा बदल होऊ शकतो. तसेच पाटलांच्या शैलीत सांगावाचे झाले तर’ कचका’ दाखविता का? अशी माफक अपेक्षा केज आअंबाजोगाई जनतेतून व्यक्त केली जात आहे.





















