कर्जमाफीचे संकेत समितीचा अहवाल आला की घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची माहिती!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
धाराशिव:- आज धाराशिव येते शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येताच कर्जमाफीची घोषणा केली जाईल अशी माहिती चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली आहे प्रहारचे बच्चू कडूसह इतर शेतकरी व संघटना सध्या राज्यात कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत यावेळी सरकारला कर्जमाफी कधी करणार आहात असे ठणकावून विचारले जात आहे त्याला महसूल मंत्री बावनकुळे यांनी आज धाराशिव मध्ये उत्तर दिले यावेळी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये कोणताही प्रकारे गोंधळ होणार नाही ही निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढणार असा उल्लेख महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना विकास कामे दिसत नाहीत का ? त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलावा लागेल? किंवा एखाद्या चांगल्या डोळ्याच्या दवाखान्यात दाखवावा लागेल ? संपूर्ण जगामध्ये मोदीच्या भूमिकेला मान्यता दिली आहे हे उद्धव ठाकरे यांना दिसत नाही का? अशा शब्दात महसूल मंत्री बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांचा पक्ष रसातळाला याकडे लक्ष द्यावे असा टोला महसूल मंत्री बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली मोदी जगभर फिरतात मात्र आपला जगात एकही मित्र नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदी यांच्यावर केली आहे या टीकेला उत्तर म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे धाराशिव जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असता आज धाराशिव मध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.





















