शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा अन्यथा मनसे करणार तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात असे म्हटले आहे कि महाराष्ट्रात चालू असलेल्या शेतकरी कर्ज माफिच्या मागणी साठी शासनाने लवकरात लवकर ठोस पाऊल उचलून कर्ज माफी करावी अन्यथा येत्या 15 आगस्ट रोजी मनसे करणार तेरणा धरणात जलसंमाधी आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद प्रशासनाने घ्यावी सदरील निवेदन मनसे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या नेतृत्वा खाली देण्यात आले या वेळी धाराशिव तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.





















