कन्हेरवाडी ईटकूर रस्ता बनला धोकेदायक पावलोपावली खड्डेच खड्डे !
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप कळंब
कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी ते ईटकूर रस्त्याची अतिशय दूर अवस्था झाली आहे दोन दोन तीन तीन फुटावर मोठ मोठे खड्डे पडलेले असून याच खड्ड्यातून प्रवासी व शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. कन्हेरवाडी ते ईटकूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे कारण या रस्त्यावर अनेक शेतवस्ती व शेतात घरे आहेत त्यामुळे या रस्त्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांची जास्त प्रमाणात रहदारी आहे तसेच कन्हेरवाडी गावचे ग्रामदैवत देवी सटवाईचे जागृत देवस्थान आहे देवीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात या रस्त्याने बाहेरगावाहून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात मागील अनेक वर्षापासून या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत व खडी उघडी पडली त्यामुळे या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नसल्याने अनेक मोटरसायकली या खड्ड्यात घसरून किरकोळ अपघात झाले आहेत या अपघातात काहींना अपंगत्व आले आहे तरी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच लक्षात येत नाही म्हणून लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याने फक्त एकदाच प्रवास करून दाखवा असे शेतकऱ्या मधुन बोलले जात आहे कारण आपण या रस्त्याने एकदाच प्रवास केला तर आपण ह्या रस्त्यासाठी आमदार किंवा खासदार निधी उपलब्ध करून देताल अशी अपेक्षा कन्हेरवाडी ईटकूर ग्रामस्था मधुन व्यक्त केली जात आहे या रस्त्यावरील खड्यामुळे आणि उघड्या पडलेल्या खडीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच शेतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना याच रस्त्याने चिखलातून कसरत करीत जावे लागत आहे सध्या पावसाळ्यात तर रस्त्यावरील खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले जात आहे त्यामुळे या रस्त्याने जाण्या येण्यासाठी कसरत करावी लागत आहे सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी कन्हेरवाडी ते ईटकूर शिवा पर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सा.बां विभागाचे आणि लोक प्रतीनिधीचे दुर्लक्ष होत आहे म्हणुन लोकप्रतिनिधी यांनी फक्त एकदाच कन्हेरवाडी ते ईटकूर रस्त्याने प्रवास करून बघा नंतरच आपला निधी या रस्त्यासाठी द्या? असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे या रस्त्याकडे अंगात पांढरी शुभ्र कपडे घालून मिरवत असलेले गाव पुढारी पण या रस्त्याकडे कोणीही लक्ष दिले जात नाही त्यामुळे खासदार साहेब आणि आमदार साहेब आपण दोघांनी तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा ? किंवा सा.बां विभागाशी चर्चा करून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होत आहे.
चौकट:
आज पर्यंत कुठल्याही लोक प्रतिनिधीने या रस्त्याकडे लक्ष दिले नाही शेतकरी,विद्यार्थी, महिलांना आणि वयोवृध्दांना उघडी पडलेल्या खडी आणि खड्यामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच संभाजीनगर,बीडला जाण्यासाठी जवळचा व वेळ वाचवण्याचा हा रस्ता असून याकडे लोक प्रतिनिधीने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करणे गरजेचे आहे – संग्राम जाधव,कन्हेरवाडी शेतकरी





















