संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांची शेतकऱ्यांसाठी फाईट सुरू!
संपादकीय/रोहन गलांडे पाटील
संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शेतकऱ्यांन साठी केलेल्या मागण्या मराठवाडा आणि लगतच्या भागात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा – अन्यथा माघार नाही असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे दिवाळीपूर्वी निर्णय घ्या, अन्यथा लढा तीव्र होईल.शेतकऱ्यांना 70,000 रु हेक्टरी भरपाई द्या.पीकं जळालेल्या शेतकऱ्यांना -1,30,000 रुपये भरपाई द्या.जनावरं, घरं, सोनं, पाईप, सोयाबीन, कापूस वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना -100% भरपाई द्या.ऊसाचा एक रुपयाही कापू नका -गरीब शेतकरी उध्वस्त होईल.नोकरदार वर्गाच्या पगाराचा चौथा हिस्सा कापा संपूर्ण कर्जमुक्ती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्या.शेतीमालाला हमीभाव द्यायचा अशा शेतकऱ्यांन साठी मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या केल्या आहेत.शेतीला नोकरीचा दर्जा देण्यात यावा अशी सुध्दा मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.





















