बर्दापूर ग्रामपंचायत कडून गावात धूर फवारणी , संकल्प, सरपंच अनिता ताई मोरे !
बदापुर/ प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील अतिवृष्टी झाल्याने सर्व परिसरातील पाण्यातील डुबके झाल्याने डासाचे प्रमाण वाढले आहे तातडीने बर्दापूर ग्रामपंचायतच्या सरपंच अनिताताई मोरे यांनी कसल्याही प्रकारची रोगराई वाढू नये म्हणून धूर फवारणी व अबेटिंन पूर्ण केल्याने असल्याचे सांगून कीटकनाश आजार पसरू नये यासाठी गावात येत्या दोन दिवसात सार्वजनिक पाण्याचे सवत रजल शुद्धीकरण करण्यात येतील प्रतिबंधक उपाययोजना पूर्ण होतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी याकडे जास्त लक्ष द्यावे अशा सूचना सरपंच अनिताताई यांनी दिल्या व गावातील झोपडपट्टी नवीन वस्ती अनेक ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली व लहान बालक वयोवृद्ध लोकांना आजार हवामानामध्ये बदल असल्यामुळे फवारणी करून मच्छर पावडरव संपूर्ण गावात फवारणी करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.





















