बोगस, तोतये पत्रकारांचा अखेर पर्दाफाश/सुपारी घेऊन करत होते पत्रकारिता/महावितरण अभियंता यांची तोतये पत्रकारा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!
केज/प्रतिनिधी
केज शहरात बोगस, तोतये पत्रकारांची अक्षरशा गर्दी झाली आहे.ब्लॉग पत्रकारिता वाढीला लागली आहे,त्यातच बीड जिल्ह्यात दैनिकाची संख्या वाढल्याने हवसे, गवसे, नवसे पत्रकारांची संख्या सुद्धा खुप वाढली आहे त्यातूनच ब्लॅकमेलिंग सारखे घटना वाढू लागल्या आहेत. 500/1000 रूपय देऊन या तोतये, बोगस पत्रकारा मार्फत आपण कोणत्या ही बातमीची शहानिशा न करता आपण कुणाचीही बदनामी करू शकतात, अशी एकूण परिस्थिती केज शहरात निर्माण झाली आहे.गुगल ब्लाॅग, युट्यूब पत्रकार भरपूर झाले आहेत, ते रोज नवनवे बकरे शोधत असतात फक्त शंभर रूपय दिली तरी ब्लॉग, युट्यूब च्या माध्यमातून बातमी तयार तीच what’s up किंवा युट्यूब किंवा फेसबुक ला लाईव्ह केली की यांची पत्रकारिता मोकळी मग त्यांत बदनाम केलेल्या व्यक्तीचा जीव गेला तरी बेहत्तर पण या पत्रकारांना याचे सोयरसुतक नाही अश्या बदनाम पत्रकारितेत आज या बोगस पत्रकारांवरच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.यातील सविस्तर वृत्तांत असा की महावितरण च्या अभियंता शितल सय्यद या शहरात फिरून लाईट मिटर तपासत होत्या त्यावेळेस त्यांच्या अश्ये लक्षात आले की हे आपल्या मिटर मधून अनेक व्यावसायिक ग्राहकांना विज पुरवठा करत आहेत त्यातूनच अभियंता शितल सय्यद यांनी मुबशीर खतीब यांना दोन लाखाच्या वर (२२४३७०) ऐवढा दंड केला त्याच रागातून स्वयंघोषित पत्रकार म्हणून असणारे त्याच मजकुराची पुनरावृत्ती स्वयंघोषित, बोगस, तोतये पत्रकार तात्या गवळी यांनी केली.तात्या गवळी यांनी स्वतःचे आदर्श क्रांती हे शासनाचे कुठलेच नियम न पाळणारे ब्लाॅग पत्रकारिता करतात तसेच मोबाईल वर न्युज मेकर नावाच्या ॲप च्या माध्यमातून वृत्तपत्रा सारखी प्रिंट काढायची व ती समाज माध्यमात टाकून त्याच माध्यमातून या दोघांनी अभियंता शितल सय्यद यांची बदनामी केली त्या उपर वीजचोर यांनी उलट अभियंता शितल सय्यद यांच्या विरोधात उपोषण करण्याचे निवेदन देऊन उपोषण केले पण या नंतर तथाकथित बोगस,तोतये पत्रकार तात्या गवळी व मुबशीर खतीब यांना चक्क माफी नामा देऊन यातून सुटका करावी लागली.सोशल मीडियावरील या घटनेमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला धक्का बसला होता. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांनी कोणतीही तडजोड न करता पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून अशा प्रकारच्या खोट्या बातम्या व अफवांवर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.सामाजिक माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे खोटी माहिती झपाट्याने पसरवली जात असल्याने प्रशासनाकडून याबाबत सर्वसामान्यांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





















