मान्सूनपूर्व कामांचा केज तालुक्यात व शहरात महावितरणला विसर/अभियंत्यांना व कर्मचाऱ्यांना नाही लोकांचे देणे घेणे!
केज/प्रतिनिधी
पावसाळा जवळ आला की, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मानसूनपूर्व कामे पूर्ण केली जातात. वीजवाहक तारांचर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, खांबावर वाढलेल्या वेली काढणे यासह इतर कामे कर्मचाऱ्यांकडून केली जातात. परंतु महावितरणच्या शहर, ग्रामीण व विभागीय कार्यालयाच्या समोर असलेल्या वीज खांबावर वेली वाढलेल्या दिसून येत आहेत. गामुळे मान्सूनपूर्व कामांचा अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे नागरीकांत चर्चा सूरु आहे. वाढलेल्या वेलीमुळे वीज जाऊन नागरीकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.दरवर्षी पावसाळ्यात सार्वजनिक वीजव्यवस्था मोडकळीस येऊन वित्तहानी होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात विद्युत तारांवर झाडे कोसळने. तसेच गंजलेले, चाकलेले, खराब वीजखांब कोसळून अपघात होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी महावितरण कंपनीकडून मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण केली जातात, कंपनी शहरातील काही कामे करून मान्सूनपूर्वक कामे केल्याचे दावा करते. परंतू ही कामे कितपत झाली हे महावितरणच्या शहर, ग्रामीण व कार्यालयासमोरील विद्युत खांबावर वाढलेल्या वेली सांगून जातात. विद्युत रोहित्राचे दरवाजे सतत उघडे शहरासह ग्रामीण भागातील डीपीना दरवाजे नाहीत, डीपीत फ्युज नसून त्या ठिकाणी तारा लावलेल्या असतात. डीपीला दरवाजे नसल्याने रस्त्याने ये-जा करणारे लहान मुले उघड्या डीपीला हात लावण्याने धोका निर्माण होऊ शकतो, उघड्या डीपीकडे ही महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे.उपविभागीय कार्यालयाच्या समोर असलेल्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या बीज खांबावर वाढलेल्या वेली दिसून येत आहेत.शहरात तसेच ग्रामीण भागत अनेक ठिकाणी वीज खांबावर वेली वाढलेल्या दिसून येत आहेत, वाढलेल्या वैलीमुळे वीज खंडीत होऊन नागरीकांना अंधारात बसण्याची वेळ येत आहे. वाढलेल्या वेली त्वरीत काढून टाकाव्यात.या वेलींने खांबावर व डीपीचर जाऊन वीज तारांना वेटोळे घातले आहेत. नागरिकांची वर्दळ असलेल्या रस्त्याच्या जवळील खांबाची अवस्था अशी झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच अद्यापही ग्रामीण भागात वीज खांबावर च तारांवर झाडे च वेली वाढलेल्या दिसून येत आहेत. ग्रामीण भागात अंधार असतानाही लाईनमन फिरकत नसल्याचे गावकऱ्याऱ्यांचे म्हणने आहे. महाविरपणच्य दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे





















