मा.आ.पृथ्वीराज साठे चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर/आजी आमदार मात्र खोट्या केसेस करण्यात बीजी ?
अंबाजोगाई/ प्रतिनिधी
माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब चिखल तुडवत, पावसाच्या थेंबांना अंगावर झेलत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतामध्ये व बांधावर जाऊन त्यांनी त्यांचे दु:ख समजून घेतले.मातीतला घाम, अश्रूंनी ओली झालेली शिवारं आणि तुटलेल्या आशा पाहून साहेबांच्या डोळ्यांतही पाणी आलं.त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितलं या मातीला मी तुमच्यासोबत पुन्हा उभं करीन, तुमचं आयुष्य पुन्हा हिरवं करीन तुमचं दु:ख माझं आहे.या दौऱ्यात शेतकऱ्यांना केवळ लोकप्रतिनिधी भेटले नाहीत, तर त्यांच्या दुःखात सहभागी होणारा एक खरा सोबती, एक कुटुंबप्रमुख भेटला. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण उजळून निघाला… कारण त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणारे पृथ्वीराज साठे साहेब त्यांच्या आशेचा आधार ठरले आहे.





















