महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना आठ दिवसात अटक करा, अन्यथा अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीडमध्ये एकत्र आलेले दिसतील- संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील
बीड/प्रतिनिधी
मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या न्यायासाठी सरकारकडे दाद मागत आहेत. काल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही कायम महादेव मुंडे यांच्या कुटुंबासोबत राहणार आहोत आणि न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही. हत्या किती क्रूरपणे झाली हे कुणाला माहीत नव्हते, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना माहीत झाले. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर आरोपी आठ दिवस मांस घेऊन फिरत होते. मुख्यमंत्री यांना मान खाली घालयला लावणारी बाब आहे. कारण तुमच्या राज्यात महादेव मुंडेचा खून होतो आणि ते आरोपी दोन वर्षे सापडत नाहीत. असे मुडदे पडत असतील तर बीड जिल्ह्यातील लोकांनी आता जागे झाले पाहिजे.फडवणीस यांचं राज्य गुंड चालवतात का? तुम्हाला या राजगादीवर बसवणारी गोरगरीब जनता आहे. मुख्यमंत्री यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ द्यावा, ते वेळ का देऊ शकत नाही? महादेव मुंडे प्रकरणात जो काही तपास होत आहे, तो तपास ज्ञानेश्वरी मुंडे यांना सांगितला पाहिजे. महादेव मुंडे प्रकरणात पहिल्या दिवसापासून ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यांचे आम्हाला सी डी आर पाहिजेत.महादेव मुंडे प्रकरणात बीडच्या जनतेने रस्त्यावर उतरायचे ठरवले किंवा आंदोलन करायचे ठरवले तर मुख्यमंत्र्यांना अवघड जाईल, मी मनोज जरांगे तुम्हाला विनंतीपूर्वक सांगत आहे की, आठ दिवसाच्या आत एसआयटी गठीत करा, त्यात मुंडे कुटुंबाचे माणसे घ्या, आरोपी अटक केल्यानंतर मुंडे कुटुंबांना सरकारी वकील द्या. या कुटुंबाला शंभर टक्के धोका आहे आणि त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी बीड जिल्हा सोडून द्या, आम्हाला त्यांची काहीही गरज नाही, आम्हाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही पालकमंत्री म्हणून काय करता आमचे मुडदे पाडता का? अजित पवार पालकमंत्री झाले तर बीडचा चेहरा मोहरा बदलेल असे आम्हाला वाटत होते पण तसे झाले नाही. फडवणीस आणि अजित दादा पवार यांना विनंती आहे की, दोघांनीही आठ दिवसाच्या आत आरोपी अटक करावी. आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीड मध्ये एकत्र आलेले दिसतील, आणि कसा मोर्चा असतो हे तुम्हाला दिसेल असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे





















