कोण आहे शौर्य पाटील,”जितना रोना है रो लो, मुझे कोई फर्क नहीं पड़ता”न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील दील्लीला जाणार!
बीड/प्रतिनिधी
“सॉरी मम्मी, मी तुमचे मन अनेक वेळा तोडले आणि मी ते शेवटच्या वेळी करत आहे. शाळेतील शिक्षक असेच आहेत, मी काय म्हणू ?” त्याच्या मोठ्या भावाबद्दल, तो म्हणाला: “सॉरी भैया, मी तुमच्याशी असभ्य वागलो, तुमच्याशी वाद घातला, तुमचा अनादर केला.” त्याच्याकडे त्याच्या वडिलांसाठी एक संदेश होता: “माफ करा बाबा, मी तुमच्यासारखा चांगला माणूस व्हायला हवा होतो .” त्याने त्याचे अवयव “काम करण्याच्या स्थितीत” असल्यास दान करण्याची विनंती देखील केली. “जर माझ्या शरीरातील कोणतेही अवयव काम करत असतील किंवा काम करण्याच्या स्थितीत असतील तर कृपया ते अशा व्यक्तीला दान करा ज्यांना खरोखर गरज आहे,” असे तो शेवटच्या चिट्ठीत म्हणाला.शौर्य पाटील दिल्लीतील एका नामांकित इंग्रजी शाळेचा आणि तेथील शिक्षकांच्या मानसिक त्रासाचा बळी ठरला आहे अजून पर्यंत सदर शाळेतील शिक्षकाना अटक झालेली नाही आणि शाळेवर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून कुटुंबियांनी मनोज दादा जरांगे पाटील यांना संपर्क करून न्यायाच्या मागणीसाठी साथ देण्याची अपेक्षा करतात आणि मनोज दादा लगेच कुटुंबाला आधार देण्यासाठी दिल्ली येथे जाऊन कुटुंबियांची सांत्वन भेट घेण्यासाठी तयार होतात यावरून इथल्या सामान्य नागरिकांना मनोज दादा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा विश्वास वाटतो .आणि हे तेच प्रदिप पाटील आहेत मूळ सांगली जिल्ह्यातील आहेत पण अनेक वर्षापासून दिल्ली येथे वास्तव्यास आहेत आणि विशेष म्हणजे जे पानिपत शौर्य दिन कार्यक्रम स्वखर्चाने व्यापक स्वरूपात साजरा करतात पण काही दिवसांपुर्वी त्यांच्यावर हि परिस्थिति ओढवली आहे.





















