कळंब तालुक्यातील दहीफळ सह अनेक गावांमध्ये खा.ओमराजे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहानी!
धाराशिव/ प्रतिनिधी
दहिफळ, खामसवाडी मोहा दहिफळ,सापनाई मंगरुळ गोंविदपुर ,ईटकुर परत अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पाऊस,जवळा ता.कळंब येथे अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन नुकसान झालेल्या शेती पिकांची व घरांची पाहणी केली. सलग झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.शेती पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरीत कारवाई करावी.शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.शेतकरी हे आपल्या राष्ट्राचे कणखर आधारस्तंभ आहेत. त्यांच्या घामाने सिंचन झालेल्या मातीतूनच महाराष्ट्राची भाकरी तयार होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने तात्काळ उभे राहून मदतीचे हात पुढे करणे ही काळाची गरज आहे असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.





















