इफेक्ट जनक्रांती न्युजचा,महावितरण यंत्रणेला आली जाग, परंतु शेतकऱ्यांची वाट लागल्यावर नवीन सब्टेशनचे काम पूर्ण होणार का ?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू झाला आहे लाईट कधी येते तर कधी जाते तर कधी दिवसभर बंद राहते त्यामुळे चिंचोली माळी येथील नागरिक हैराण झाले आहेत तसेच शेतकऱ्यांना लाईटचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही कारण विहीरी वरील शेतकरी मोटर चालू करुन बांधावर जातो का नाही तोपर्यंत लाईट जाते व मोटर बंद पडते त्यामुळे शेतकरयांचे पीकांचे नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या मुळावर कोण उठला आहे यांचे काय गणीत कुनाला समजेना कारण एकीकडे निसर्गाने शेतकरी मारला तसेच आता महावितरण कंपनी शेतकऱ्यांना मारायचे ठरवले आहे असे झाले आहे त्यामुळे महावितरण कंपनीने जनाची नव्हे तर मनाची तयारी बाळगुन चिंचोली माळी येथील शेतकरयांना गावकऱ्यांना व्यवस्थीत विज पुरवठा करावा असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















