आळणी सरपंच प्रमोद वीर यांच्या पाठपुराव्याला यश!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील आळणी या गावात गेल्या अनेक दिवसापासून वानर /माकड वन्यजीव या प्राण्यापासून शेतकऱ्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत होते. वानर/ माकड यांच्यामुळे गांव व परिसरात शेती पिकाचे नुकसान,घरांचे नुकसान,पत्रांचे नुकसान,सोलार, डिश,नळ,पाण्याची टाकी मानव जीवितेला धोका पोहोचवणे असे भयानक त्रासाला येथील नागरिक सामोरे जात होते परंतु ही बाब लक्षात येताच आळणी गावचे सरपंच प्रमोद नेताजी वीर यांनी व गावातील लोकप्रतिनिधी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वनविभागाच्या माध्यमातून हे प्राणी वनविभागापर्यंत पोहोच केले परंतु या वानर/ माकडाचा वावर काही कमी होत नव्हता दिवसेंदिवस वाढतच होता ही बाब लक्षात येताच गावचे सरपंच वीर यांनी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना एका निवेदनाद्वारे ही बाब लक्षात आणून दिली आमदार राणा दादानी तात्काळ वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात भेट घेऊन मौजे आळणी ता.जि.धाराशिव येथील वानर हे वन्यजीव पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणे बाबत विनंती केली शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मंत्री महोदय वनमंत्री गणेश नाईक यांनी क्षणभर विचार न करता शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असल्यामुळे तात्काळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही समस्या सोडविण्याचे आदेश देण्यात आले व अमलबजावणी करण्याचे निर्देश दिले या निर्णयामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील,आळणी गावचे सरपंच प्रमोद नेताजी वीर यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला असून गावातील शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.





















