अतिवृष्टी झाल्याने नुकसानभरपाई साठी मौज बोरगांव (बु)येथील हनुमान मंदीर येथे अमरण उपोषण !
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बोरगाव येथे अतिवृष्टी झाल्याने नुकसानभरपाई साठी मौज बोरगांव (बु)येथील हनुमान मंदीर येथे अमरण उपोषण करण्यात येणार आहे उपोषणकर्ते विकास नवनाथ शिंदे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की नवनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की वरील गावचा रहीवाशी असुन मी शेती करुण उदरनिर्वाह करणारा शेतकरी आहे. आमचे गाव मांजरा नदीकाठी असुन, यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे माझ्या व गावातील सर्व शेतकऱ्यांचे पिकाचे व जमीन खरडुन गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे.सदर शेतीमध्ये असलेले सोयाबीन पिक हे पुर्ण पणे मांजरा नदीच्या पुराच्या पाण्याणे बाहुन गेले आहे व सदरील पिक हे वाहुन गेल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना उदरनिर्वाहसाठी कोणतेही साधन नाही तसेच नदीकाठच्या आमच्या जमीनी मातीसह पुर्णपणे खरडुन गेलेल्या आहेत व सदरील जमीनीमध्ये कसल्याही प्रकारची माती शिल्लक राहीलेली नाही त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना येणाऱ्या रबी हंगामातील पेरणी सुध्दा करणे अशक्य झाले आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या अतिवृष्टी/महापुरामुळे खरडुन गेलेल्या शेत जमीनीचे पंचनामे करुण तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, पिक कर्ज माफ करण्यात यावे.बाधीत विहीरीचे, सोलार पंप, तुषार सिचंन सेट नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. थकबाकी मुळे होल्ड केलेले बैंक खाते रिलीज करण्यात यावेत. महाराष्ट्र ग्रामीन बॅंक चिंचोली माळी घरकुलाचे हप्ते विनामोबदला व एम.आर.इ.जि.एस मधील मजुरांचे हप्ते तात्काळ काढण्यात यावे व पैश्याची मागणी करणाऱ्या अधिकारी व पदअधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.तरी मे. साहेबांना विनंती आहे की, स्वतः लक्ष घालुन आमच्या वरील मागण्यावरती तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा वरील ठिकाणी बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल अशा इशारा गावकरी सह नवनाथ शिंदे यांनी म्हटले आहे .





















