अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ सुरूचं?मतदार याद्यांचा घोळ मिटता मिटेना, उमेदवारात मतदार याद्यां संदर्भात संभ्रम.!
अंबाजोगाई/ प्रतिनिधी
राज्यात नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागून आठ दिवस उलथून गेले तरी मतदार याद्यांचा घोळ मिटता मिटेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप अपक्ष उमेदवारात मतदार याद्यां संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.उद्या दि.१० सोमवारपासून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल भरण्यास सुरुवात होणार आहे, तरी नगरपरिषद प्रशासनाचा मतदार यादी संदर्भातचा सावळा गोंधळ संपता संपेना, मतदार याद्याचा संदर्भाने उमेदवारांना डोक्याला ताप झाला आहे, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संभाव्य उमेदवाराकडून अनेक हरकती नोंदवण्यात आल्या होत्या, नोंदवल्या गेलेल्या हरकती सुनावणीनंतर नगरपरिषद प्रशासनाने अंतिम मतदार याद्या चक्क दोनदा प्रसिद्ध केल्या गेल्या होत्या, यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाने कोणती मतदार यादी अंतिम आहे या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिले नाही, हा गोंधळ सुरू असतानाच पुन्हा निवडणूक आयोगाच्या तारखेनुसार बूथनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली असून, प्रसिद्ध केलेल्या बूथ याद्या सोबत पुरवणी मतदार यादी जोडली गेली असून याबाबतीत प्रसिद्धी देणे महत्त्वाचे असताना, निवडणूक विभागाकडून कोणतेही प्रसिद्धि दिली नसून आपल्या प्रभागातील मतदार शोधताना सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना डोक्याला ताप झाल्याचे दिसून येते.
अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ सुरूचं !
अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक निर्णायक अधिकारी उपजिल्हाधिकारी दिपक वंजाळे, तहसीलदार विलास तरंगे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, निवडणूक विभाग प्रमुख म्हणून अंबाजोगाई परिषदेचे कर्मचारी सय्यद अन्वर, शेख इफ्तेकार कारभार पाहत असून संभाव्य उमेदवारांकडून मतदार याद्या संदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात यावरूनच अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ सुरू असल्याचे निदर्शनास येते.
अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक अधिकारी वादाच्या भवऱ्यात
राज्यात निवडणूक आचारसंहितेची घोषणा होऊन आठ दिवस उलटून गेले तरी निवडणूक प्रशासनाकडून याद्याचा घोळ मिटला नसून किंवा प्रशासनाकडून अधिकृत माहिती नसल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना जोरदार फटका बसणार असल्याचे दिसून येते, तसेच निवडणूक विभाग प्रमुख असलेल्या न.प.कर्मचारी सय्यद अन्वर, शेख इफ्तेकार यांचा हलगर्जीपणा, मतदारांना तसेच राजकीय पक्षांचे संभाव्य उमेदवार, उमेदवार प्रतिनिधीना उडवा उडवीची उत्तरे देणे असभ्य वागणुकीमुळे अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक अधिकारी वादाच्या भवऱ्यात अडकले असल्याचे स्पष्ट दिसून येते.





















