मालेगाव चिमुकली हत्या प्रकरणी , कलाकार हिंदवी पाटील यांची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चौरंग कायदा लागू करा !
पुणे/प्रतिनिधी
मालेगाव नजीक डोंगराळे येथील साडेतीन वर्षाची चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर अत्याचार करून तिची निर्दयपणे क्रूर हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चौरंग कायदा महाराष्ट्रात लागु कारा अशी मागणी कलाकार हिंदवी पाटील यांनी व्यक्त केली आहे.हिंदवी पाटील यांनी पुढे म्हटले आहे की अलीकडील काळात दहा वर्षाखालील चिमुकल्या मुलीवर अत्याचाराचे व हत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. गुन्हेगारांवर कसलाच वचक राहिलेला नाही. राज्य व केंद्र सरकारने जनतेच्या भावना व मागणी लक्षात घेऊन अशा विशिष्ठ संवेदनशील प्रकरणात विशेष कायदा करून आठ दिवसाच्या आत दिवसरात्र तपास व चौकशी करून दोषी असल्यास गुन्हेगाराला आठव्या दिवशी फाशी देण्यात यावी. असे झाले तरच अशा प्रकारच्या घटना थांबतील व जनतेचा कायद्यावरील विश्वास कायम राहील.मात्र असे न होता अशा गुन्ह्याचा तपास व न्यायिक प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत राहते. त्यामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. आता लोकांचा संयम तुटू लागल्याने व कायद्यावरील विश्वास उडत चालल्याने लोक आता कायदा हातात घेऊन पोलिसांचे कडे तोडून न्यायालयात परिसरात घुसू लागले आहेत जे मालेगाव येथे घडले. आता शासनाने जनतेच्या संयमाची वाट न पाहता तात्काळ अशा प्रकरणातील आरोपीला आठ दिवसात फाशी देण्यासाठी कायदा व प्रक्रिया बदलावी किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चौरंग कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी कलाकार हिंदवी पाटील यांनी व्यक्त केली आहे.





















