ब्रेकिंग न्यूज
मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गावातील तरुणांनी राबवला उपक्रम/एक रविवार गावच्या स्वच्छतेसाठी, कौतुकास्पद !एमआयडीसीच्या गलथन,भोंगळ कारभारामुळे इतर जिवांचे जिवन धोक्यात/कंपन्यांच्या केमिकल युक्त पाण्याने नदी पात्राचे पाणी दूषित ?मनोज जरांगे पाटील ३० मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं !चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम पुर्ण कधी होणार का ?/येणाऱ्या पावसाळ्यात पन चिखलातून गावकऱ्यांना प्रवास करावा लागणार गुत्तेदार साहेब ?सीना नदी येथील सीना नदीत एमआयडीसीतील अनेक कंपन्या केमिकलचे दूषित पाणी सोडत आहेत . नदीपत्रातील पाणी दूषित!शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांचा नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते गौरव/राज्यस्तरीय “आदर्श प्राचार्य पुरस्काराने” डॉ. चंद्रसेन कोठावळे सन्मानित !पोलिस बांधवांनो,बदलीसाठी नेत्यांनी फोन केल्यास कारवाई!छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त नायगावात भव्य रक्तदान शिबिर ; 26 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग!
मनोज जरांगे पाटील ३० मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं !
बीड/प्रतिनिधी
मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होते. यावेळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण अडीच-तीन वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात ऍडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण अडीच-तीन वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात ऍडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फडणवीस, तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय आपल्याकडे रुपया नाही, पैशावाले आपल्यात येत नाहीत. मी प्रामाणिक आहे. आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे. मुंबई तुम्ही विचाराने जिवंत केली. मुंबईतील लोक आम्हाला पुन्हा येणार का? म्हणून विचारतात. आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसले नाही पाहिजे. नुसते मराठेच दिसले पाहिजे. मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण तुम्ही का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.




















