एमआयडीसीच्या गलथन,भोंगळ कारभारामुळे इतर जिवांचे जिवन धोक्यात/कंपन्यांच्या केमिकल युक्त पाण्याने नदी पात्राचे पाणी दूषित ?
सोलापूर प्रतिनिधी/अजित सुरवसे
उत्तर सोलापूर येथील सीना नदीत एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी केमिकलचे दूषित पाणी सोडत आहेत . त्यामुळे जनजीवन विस्कळित होत चालले आहे त्यांचे परिणाम अनेक जिवांना भोगावे लागत आहे तरी येथील प्रशासनाने असे दूषित केमिकल युक्त पाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण नदीपा त्रातील पाणी दूषित झाले आहे व दूषित पाण्यामुळे जनावरांना व शेतकऱ्यांना त्या पाण्याचा त्रास होत आहे तसेच आजारी पडत आहेत परंतु प्रशासन तेरीभी चुप मेरी भी चूप असे काम प्रशासन करत आहे मुगिळुन गप्प बसले आहे परंतु कंपन्यावर कारवाई केली जात नाही यांचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला आहे प्रशासन व कंपनीच्या मध्ये काय लागे बांधे आहेत अशा वागण्यामुळे अनेक जनावरे आजारी पडत आहेत उन्हाळ्यात जनावरांना पाणी दूषित केल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच अनेक ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.





















