जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणारी ती नतद्रष्ट औलाद कोण?विचारांची लढाई विचाराने लढा , कटाच्या पाठीमागचा आका शोधून काढा?
बीड/प्रतिनिधी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची तक्रार जालना पोलिसात दाखल करण्यात आली असून या कटाच्या मागचा आका कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे असे कट रचले जात असेल तर ही खूप गंभीर बाब आहे विचारांची लढाई विचारांनी लढावी मात्र एखाद्याच्या जीव घेण्या खेळया खेळून काहीच साध्य होत नाही अश्या कट रचणाऱ्या नतद्रष्ट औलादी कोण? याचा शोध पोलिसांनी तात्काळ घेण्याची गरज आहे.मराठा समाज एका हाकेवर ज्यांच्यापाठीशी कोटींनी उभा राहतो त्या व्यक्तीमत्वावर जर कोणी कट कारस्थान करून संपविण्याचा विचार करत असेल तर ही खूप गंभीर बाब म्हणावी लागेल बैठका आणि कट रचण्याचे काम होत असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाने याचा शोध घेणे गरजेचे आहे आणि ते लोक कोण आणि त्यांचा आका कोण याचा शोध तात्काळ लागला पाहिजे लढाई ही विचाराने लढली पाहिजे असे कटकारस्थान करून माणूस संपविण्याचा डाव करणे हे निंदनीय आहे अश्या नतद्रष्ट औलादिंचा शोध घेऊन जेरबंद करणे गरजेचे आहे.





















