केज तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी वरचा जनेतचा विश्वास डळमळीत/केजचे नेते मंडळी झोपली आहे का?
केज/प्रतिनिधी
कोरडेवाडी साठवण तलाव करण्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत याकडे दुर्लक्ष केले जाते म्हणून कोरडेवाडी ग्रामस्थांनी काल केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको करण्यात आला त्यावेळी आंदोलनातील काही आंदोलकांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला पन पोलीसांनी तो प्रयत्न हाणून पाडला या आंदोलनासाठी चक्क बीड जिल्ह्यातील एक ही नेता हजर नव्हता पन जालना जिल्ह्यातील मागेल त्यांना पुतळा फेम बाळासाहेब आवारे पाटील आवतरले अन् काय चमत्कार झाला अन् बीड जिल्ह्यातील सर्व प्रशासन कामाला लावले जनतेची मागणी रास्तच आहे पन या मागणीसाठी बीड किंवा मंत्रालय येथे साठवण तलावाची मागणी करायला हवी होती कारण ही जनतेची मागणी अन् मंजुरी केज तहसिलदार साहेबाच्या हातात नाही जनतेची मागणी ही शासनाकडे सादर करत आसतात पन काही जन हे आंदोलन कसे भडकत राहील किंवा हाताबाहेर जाऊन लाठीमार आश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्यात यासाठी आतुर झालेले दिसले बाहेर गावावरुन यांनी लोक बोलवले होते काही जन परभणी कळंब धाराशिव या आवारे पाटीलानी जेथे जेथे पुतळे बसवले तेथे फोन करुन केजला लोक बोलवले होते यांचा अनैतिक कावा ओळखुन ते आलेल्या पावलांनी परत गेले तेथेच यांचा डाव फसला त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा केज तहसिल कार्यालयात ठिय्या मांडला व रात्री ९.३० पर्यंत प्रशासनाने संयम ठेवत ठेवत चर्चेच्या फैरी झडत ठेवल्या त्यानंतर तेथेही प्रशासनाकडून टोकाची भूमिका घेतली नाही आपला लाठीमाराचा उद्देश सफल होताना दिसत नाही हे स्पष्ट झाले त्यानंतर माघार घेतली दुपारी बारा ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत त्यांनी प्रशासन रस्त्यावरची वाहतूक कोंडी केली शेकडो लोकांचे हाल केले त्यांना त्यांचे सोयरसुतक नाही बाहेरुन आणलेल्या लोकांकडून बस फोडल्या जनता वेठीस धरली साठवण तलावासाठी इतका टोकाचे आंदोलन आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं असे अनेक नागरिक बोलत होते तलावात गेलेल्या जमिनीचे पैसे मिळावेत म्हणून आंदोलन केले आसते तर ते जनतेने समजुन घेतले आसते केज तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी दुरलक्ष करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत नाही तर बाहेर गावावरुन आलेले लोक तालुका पेटवून निघुन जातील पन कायदेशीर कारवाई जनतेला भोगावी लागेल पोलीस प्रशासनाने यापुढे १ तासाच्या पुढे कोणतेही आंदोलन होऊ नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे गोरगरीब जनतेपेक्षा भडकावणारे दललावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





















