धन्याला सहआरोपी करा अटक करा,जर अरोपी सुटण्यासाठी प्रयत्न केला तर धन्या तुझ्या मुंडक्यावरच पाय देतो,सर्व आरोपींना फाशीच झाली पाहिजे – मनोज दादा जरांगे पाटील
केज/प्रतिनिधी
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मागील वर्षीय याच दिवशी देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या टोळीने देशमुख यांचं अपहरण करून बेदम मारहाण करत जीव घेतला होता. या प्रकरणी कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. आज संतोष देशमुखांच्या प्रथम पुण्यस्म रणाच्या दिवशी मराठा जरांगे पाटील संतापले कारण आरोपी जोपर्यंत फासावर जात नाही, तोपर्यंत न्याय नाही आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणीही जरांगे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असंही त्यांनी सांगितलं.धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे म्हणाले की, धन्या आडकाठी आणतोय. आरोपी सुटण्यासाठी प्रयत्न करत असले तर त्यांच्या मुंडक्यावर पाय देवू. धनंजय मुंडे आरोपींची आठवण येते असं म्हणतोय. कितीही राक्षस असला तरी नीतीला धरून असायचे. राक्षस नियम पाळायचे. पण ही पैदास राक्षसाची देखील नाही. इथून पुढे जर काड्या केल्या, फोनवर धमकी दिली तर नीट केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. आता जशास तसं वागावं लागेल. आपण किती दिवस गप बसायचं. इकडे मूडदे पडायला लागले. एक खून झाला तरी किती भाषण आम्ही ऐकायचे. तो आनंदाने भाषण करतोय. क्रूर हत्याऱ्याची बाजू घेतो मी जे जे आंदोलन केले त्याचा परिणाम म्हणजे या तोही क्रूर आहे. धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. अजितदादा तर वाया गेलेला माणूस आहे. धनंजय देशमुख तुम्ही तुम्हाला एकटे समजून नका, ६ कोटी मराठे तुमच्यासोबत आहेत. आरोपी जोपर्यंत फासावर जात नाही, तोपर्यंत न्याय नाही, असंही मनोज जरांगे म्हणाले.आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणीही जरांगे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असंही त्यांनी सांगितलंतसेज धनंजय देशमुख यांनी म्हटले या प्रकरणातील आरोपी ११ महिन्यापासून जेल बंद आहेत. आता त्यांच्यावर १२ डिसेंबर रोजी आरोप निश्चिती होईल. हे प्रकरण लवकर कोर्टात चालावे असे आमचे प्रयत्न आहेत. कोर्टाने देखील तसे संकेत दिले आहेत. या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा होणार आहे. ही गुन्हेगारी संपणार असल्याचे शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला होता. यावरही काही करायची गरज पडली तर गाव आणि मी स्वतः भाऊ म्हणून कुठलीही गोष्ट करायला तयार आहोत. असेही बंधू धनंजय देशमुख म्हणाले.





















