जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुक तोंडावर गल्लीबोळातले भुरटे पुढारी झाले जागे? पावसाळ्यातल्या बेडका सारखे येऊ लागले बाहेर?
बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत व संध्यांची परीस्थिती पहायला गेलो तर गल्लीबोळात माशा मारत बसणारे भुरटे पुढारी निवडणूक तोंडावर नागरिकांना चहा पाणी करताना दिसत आहेत तसेच तुमचे आम्ही हे काम करु ते काम करु असे मोकाट आश्वासन देताना दिसतात मग सात आठ वर्षे हेच भुरटे पुढारी काय नागा साधू बनून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लवकर व्हाव्यात म्हणून तपस्या करायला गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे जनतेने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत जो व्यक्ती तुमच्या अडीअडचणीच्या काळात वर्षातील बारा महिने सेवेत आहे अशा नेतृत्वाला निवडा कारण पावसाळ्यात निघणारे बेडकं पावसाळ्यातच येतात तसेच निवडणूक तोंडावर गल्लीबोळातले भुरटे पुढारी बाहेर निघत आहे अशा भुरट्या पुढाऱ्यांना निवडणुकीत कायमचे गल्लीतच राहुद्या असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















