छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील फलकाची अक्षरी तुटले !
प्रतिनिधी/जालना
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उतरतात प्रत्येकाच्या मनातून जय शिवराय असा नाद घुमतो.हिंदवी स्वराज्याचे प्रणेते,पराक्रमी व शौर्याचे प्रतीक असलेल्या त्या राजांचे नाव शहराच्या प्रत्येक भागात गौरवाने झळकले पाहिजे.मात्र जालना शहरात या महान राजांच्या नावाचीच विटंबना झाल्याचे दुर्दैव चित्र पाहायला मिळाले आहे.जालना शहरातील टाऊन हॉल परिसरात असलेला छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातून लावलेल्या फलकावरील अक्षरे तुटून खाली पडले असून,त्यामुळे संकुलाचे नाव अपूर्ण व अवमानकारक स्वरूपात दिसत आहे.जालना शहर महानगरपालिकांनी याकडे लवकरात-लवकर लक्ष द्यावे.अन्यथा धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.अशी प्रतिक्रिया लक्ष्मण गाडेकर पाटील,धर्मवीर छावा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष जालना यांनी दिली आहे.





















