राजेगाव ता.जी.बीड मध्ये मांजरा नदीचा रोद्रावतार नदीपात्रा बाहेरील तीन किलोमीटर परिघ पाण्याने व्यापला.नागरिकांनो घाबरू नका , सतर्क रहा!
केज/प्रतिनिधी
केज जिल्हा बीड येथील आहेत . मांजरा नदीकाठच्या जवळपास तीन किलोमीटर परिघामध्ये दुथर्पा बाजूने मांजरा नदीचे पाणी नदीपात्र बाहेर गेल्याने संपूर्ण गावे , जमीन पिके जमिनध्वस्त झाली आहे . पिकासहित शेतामधील माती वाहून गेल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे . सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे . तसेच पशुधन , गुरे -ढोरे पूरात वाहून गेली आहेत .जुनी घरांची पडझड ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे . खरं तर राज्य शासनाने वेळ न दवडता ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करणे अत्यंत आवश्यक आहे . आज हीच परिस्थिती जवळपास बहुतांशी जिल्ह्यामध्ये झालेली आहे . खऱ्या अर्थाने शेतकरी – गावकऱ्यांनी मनोधैर्य राखत स्वतःचा जीव वाचवावा … पशुधन वाचवावे कारण संततधार मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी नदी -तलाव ओसंडून वाहू लागले आहेत त्यामुळे घाबरून न जाता सतर्क रहावे…असे आवाहन शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे यांच्या वतीने करण्यात येत आहे . याप्रसंगी उपस्थित शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे , जिल्हा युवक अध्यक्ष सुनील कुटे , शिवसंग्रामचे माजी अध्यक्ष लिंबराज वाघ , दोडके फौजी श्री बाळासाहेब गलांडे,त्रिंबकजी मेटे, युवराज कदम , बालाजी मेटे ,परिसरातील नागरिक , गावकरी बांधव तसेच शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.





















