सल्ला देणाऱ्याने उंटावर बसून काडीने मलम लावणे बंद करावे/इगो असेल तर तुमचा चुलीत घाला समाजापुढे कोणीच मोठा नसतो!
संपादकीय/रोहन गलांडे
मराठा आरक्षणाचा लढा देतांना मनोज दादा जरांगे पाटलांचा उपाशी तापाशी फेस पडला समाजाला त्यांचे हाल पाहवत नव्हते तीळ तीळ जीव तुटत होता खरेतर आरक्षणाचे काहीपण होईल परंतु आपल्याला मनोज दादांची तब्येत बिघडू नये अशी भूमिका समाज स्वीकारण्याची तयारी ठेवणार होता मग या वेळी जरी दगाफटका झाला तरी पुन्हा त्याच जोशात मराठे रणांगणात उतरतील यात शंका नाही 40 वर्षे सहन केले अजून एक दोन वर्षे पाच वर्षे सहन करू ही मानसिकता समाज ठेऊन आहे, जे निर्णय झाला त्यावर समाज आज तरी खुश आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, जे मिळाले ते ठीक अजून पुढे लहू, ही मानसिकता समाजाने स्वीकारली आहे. त्यामुळे आता जास्त ज्ञानी लोकांनी अमुक तमुक फसवणूक झाली म्हणून जास्तीचे ज्ञान पाजळून उंटावर बसून काडीने मलम लावण्याचे काम तर अजिबात करू नये अशी स्पष्ट भूमिका सोशल मीडियावर समाज मांडत आहे, योगेश केदारांनी तरी त्या ठिकाणी वेळ दिला त्यांनी बोलणे ठीक आहे मात्र कोणीही उठते आणि ह्याव फसवणूक आणि त्याव्ह फसवणूक झाल्याचे सांगत सुटले आहेत झाली तर झाली अजून एकदा लढू राजकारणी तरी उघडे पडतील आणि समाज देखील त्यांची नोंद घेईल ना ?परंतु समाजाचे असतांना इतका इगो कशासाठी आणि तुमची लढाई कोणासाठी आहे? समाजासाठी असेल तर समाजासोबत राहून लढले पाहिजे मागण्या कश्या योग्य आहेत काय केल्या पाहिजेत कुठे चुकतो, बरोबर आहे सांगितले पाहिजे, वेळ निघून गेल्यावर जर कोणी चूक काढून स्वतःचे ज्ञान पाजळत असेल तर तो तत्वज्ञानी समाजाच्या काहीच कामाचा नाही, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल आणि समाजाचे भले व्हावे असे वाटत असेल तर आज तरी स्वतःचा इगो बाजूला सारून मनोज दादांच्या सोबत च्या लढ्यातच सहभागी झाले पाहिजे आणि आपण किती हुशार, महान बुद्धिजीवी आहोत याचे दाखले समाजाला दाखवून दिले पाहिजे आणि कायदेशीर आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी निःस्वार्थी प्रयत्न केले पाहिजेत मुझे गिनो असे जर वाटत असेल तर आज समाज मंत्र्यांना सुद्धा जुमाणेंना मग तुम्हीं तर कोण? इतका इगो कोणाला असेल आणि माझ्याकडे समाजाने यावे किंवा मला सन्मानाने बोलावं असे कोणाला वाटत असेल तर शेवटी समाज सुद्धा मराठा जातिवंत आहे कोणालाच जुमानत नाही वेळप्रसंगी हे पुन्हा नव्याने सांगायची गरज नाही याचे भान तत्वज्ञान पाजळणाऱ्या आणि स्वतःचा इगो कायम ठेवणाऱ्याला त्याचे ज्ञान त्याला लखलाभ, परंतु सर्व आंदोलन आणि त्यावर निघालेल्या तोडग्यावर जर कोणी तर्क वीतर्क लावून आणि समिती आल्यावर उपस्थित नसणाऱ्या लोकांनी उंटावर बसून काडीने मलम लावण्याचे काम करून आम्ही खरे समाजाचे कैवारी असल्याचा पुळका अजिबात दाखवू नये अशी स्पष्ट भूमिका समाज समाज माध्यमातून व्यक्त करतांना दिसत आहे.





















