मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सत्यप्रेम बोंबडे यांना न्याय कधी मिळणार?७५ वर्षीय सत्यप्रेम बोबडे गेल्या वर्षभरापासून शासन दरबारी खेटे मारत आहेत !
केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील पाणी वाहून जाऊ नये म्हणूनच कोल्हापुरी बंधारे बांधले जातात, पण जर त्यालाच दरव-जे नसतील तर? हा साधा प्रश्न घेऊन ७५ वर्षीय सत्यप्रेम बोबडे गेल्या वर्षभरापासून शासन दरबारी खेटे मारत आहेत. माहिती अधिकारात विचार-लेली साधी माहिती मिळत नसल्याने त्यांनी अखेर राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल केले असून, २२ जुलै रोजी संभाजीनगर येथे सुनावणी होणार आहे.केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील केजडी नदीवर १९९३ मध्ये बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला आजपर्यंत दरवाजेच बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होण्याऐवजी दरवर्षी पाणी वाहून जात आहे. या बंधाऱ्याच्या देखभाल, दुरुस्ती आणि दरवाज्यांच्या स्थापनेसंदर्भात माहिती मागवूनही ती न दिल्यामुळे सत्यप्रेम बोबडे यांनी प्रथम अपील केलं, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी राज्य माहिती आयोगाकडे धाव घेतली.राज्य माहिती आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले असून, सर्व पुरावे व लेखी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. एका वृद्धाचा हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. माझं वय पंच्याहत्त् रीिचं आहे. आजारी शरीर घेऊनही मी हे धाडस केलंय, कारण ही लढाई केवळ माझ्यासाठी नाही, तर आमच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी आहे. अखेर राज्य माहिती आयोगाचे दार ठोठावलं. आता तरी न्याय मिळेल, हीच आशा आहे. असं सत्यप्रेम बोबडे यांनी अत्यंत भावूकतेने सांगितलं.





















