पाऊस येतो हातभर, लाईट जाते रात्र भर काय ते म्हणे जिल्हा परिषदेला मते द्या भरपूर!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात अनेक गावांमध्ये लाईट नाही व वीज महामंडळाकडून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कारण भूरभूर पाऊस आला तरी रात्रभर लाइट गायब होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यापेक्षा भयानक गर्मी पावसाच्या वेळी होते आणि अशात लाइट गेल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत लागत आहे. आहे. वीज मंडळाच्या गलथान कारभाराविरोधात कोणीही नेता बोलायला तयार दिसत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निघाले तर नेत्यांना कळेल की त्रास काय असतो. म्हणून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व नेतेमंडळींनी पुढाकार घेणे गरजेचे दिसते. याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने मोठा पाऊस झाला आणि वारा सुटला तर बीजपुरवठा खंडित होणे समजण्यासारखे आहे. परंतु भूरभूर पाऊस झाला तरी गाव खेड्यापाड्यात प्रत्येक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. आणि एक-दोन तास नव्हे, तर पाच ते सहा तास वीज येत नसल्याने पावसाच्या नावाखाली वीज मंडळ लोडशेडिंग तर करत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे जिल्हा परिषद निवडणुकीचे भावी उमेदवार तर पांघरून घेऊन गप्प झोपलेले दीसत आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















